
प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे.
आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे.
आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर
आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने
कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी
प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.
गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य,
शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण,
परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र
एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत
नाही.
वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात
विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर.
भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.
प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत
पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.
घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी
मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला
ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. 'गुरु बिन ज्ञान
कहासे लाऊ?' हेच खरे आहे.
श्लोक बाहेर पडतो -
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll
आभार - बालसंस्कार.कॉम
"E - LEARNING PROJECTS बनवावा शाळेतच अगदी सोप्या पद्धतीने"
दैनिक पाठ टाचनाचे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खलील बटनाला क्लीक करा
इयत्ता १ ली ते 8 वी साठी सर्व विषयाच्या PRITABLE WORKSHEET डाउनलोड करण्यासाठी खालिल बटनाला क्लीक करा 
























